‘धर्मरावबाबा आत्राम’, अखंड माणुसकीचा झरा जपणारं नेतृत्व

‘धर्मरावबाबा आत्राम’, अखंड माणुसकीचा झरा जपणारं नेतृत्व

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची जनतेशी जुळलेली भावनिक मायेची नाळ आजही बघायला मिळते. सध्या राज्याचे कॅबिनेट मंत्री पदावर असलेले धर्मरावबाबा आत्राम यांच्यात अजिबात बदल झाला नसून पदावर असो किंव्हा नसो. त्यांची मायेची नाळ मात्र अगदी सर्व सामान्यांशी जुळलेलीच आहे.

काल ते एटापल्ली तालुक्याच्या दौऱ्यावर होते. एका 70 वर्षाच्या आजीबाईंना बाबांना भेटायचं होतं. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्या आजीबाईंना अडविले हे बाबांच्या लक्षात येताच त्यांनी आजीबाईला चक्क मंचावर बोलावून स्वागत करत गप्पा मारल्या. आजीबाईंनी ओळख देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. अगदी 7 महिन्याचा बाळ असो किंव्हा 70 वर्षाची आजी प्रत्येकाला आपलंसं वाटावा असा स्वभाव राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्यामध्ये आजही बघायला मिळाला.

एवढ्या मोठया पदावर असून देखील त्यांनी पदाचा कधीच गर्व केला नाही त्यामुळेच आज प्रत्येकजण बाबांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधतात. कितीही थकले तरी सर्व सामान्य नागरिकांना ते नेहमीच वेळ देतात. म्हणून याही वयात तरुण पिढीला ते आवडतात.

error: Content is protected !!