केंद्र सरकार आदिवासी समाजाचे हित जोपासणारे – खा. अशोक नेते

केंद्र सरकार आदिवासी समाजाचे हित जोपासणारे – खा. अशोक नेते

माता अनुसया सेलिब्रेशन हॉल, नालवाडी येथे भव्य आदिवासी समाज मेळावा 

वर्धा, २३ एप्रिल :- आदिवासी समाज एकसंघाने एकत्रित येऊन सामाजिक लढा दिला पाहिजे. आदिवासी समाजाचे हित जोपासत समाजाच्या विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध असून या समाजाच्या विकासासाठी शासन स्तरावर अनेक योजना कार्यान्वित करून अंमलात आणले आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आपल्या स्तरावर प्रयत्नशील आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी म्हणून द्रोपदी जी मुर्मू यांना विराजमान केले. खऱ्या अर्थाने आपल्या आदिवासी समाजाला मिळालेला हा बहुमान आहे. आदिवासी समाजासाठी राज्य शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती देत केंद्र सरकार सुद्धा समाजाच्या हितासाठी व विकासासाठी कटिबद्ध आहे‌, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

आदिवासी समाजाचे कुंवार भिमसैन व हनुमान जयंती या निमित्ताने औचित्य साधुन भव्य आदिवासी समाज मेळावा २३ एप्रिल रोजी माता अनुसया सेलिब्रेशन हॉल, नालवाडी जि. वर्धा येथे आयोजित करण्यात आला. खासदार अशोक नेते यांचे शुभहस्ते आदिवासी समाज दैवतांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर आदिवासी मोर्चाचे प्रदेश महामंत्री नितिन मडावी, माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, शंकर आत्राम, नीता गजाम, सरस्वती मडावी, भारत कोवे, नलिनी सयाम, राजु मडावी, अक्षय उईके, प्रल्हाद पोयाम, शारदा तुमडाम, पद्मा कोडापे, अर्चना उईके, विठ्ठलराव घडीनकर, किसन वाघमारे, ताराचंद दुर्वे, तसेच मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!